मित्रांनो, मानवी आहारात पालेभाज्या, फळभाज्या ह्यांचं जसं महत्वं आहे तसच महत्व कडधान्याचं देखील आहे. कडधान्य उत्पादनाचा महाराष्ट्रातला आलेख पाहीला तर तो वाढताच आहे. अधिक अधिक शेतकरी मुख्य पिक तर काही शेतकरी आंतरपिक म्हणूनही कडधान्य लागवडीला महत्व देउ लागले आहे. हरभरा, हे असच मानवी आहारातील, आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांच्या आहारातील नेहमीचे कडधान्य. हरभरा उत्पादन देखील गेल्या बऱ्याच वर्षात वाढत आहे आणि ह्या उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांनी नफा देखील कमावला आहे. ह्यावरुन ह्या पिकाचं आहारासोबतच शेतीतही खुप महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलच असेल. पारंपरिक शेती सोडून, नव्या तंत्राने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ किलोपर्यंत वाढते असे लक्षात आले आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या विदर्भातील शेतकरी या पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.
ह्या पिकासाठी पाणी फार महत्वाचे आहे. पाऊस व्यवस्थित झाला नसेल तर पाण्याची मुबलक उपलब्धता असणे गरजेचे आहे. नाहीतर उत्पादन घटू शकते.
त्यामुळे हरभऱ्याची पेरणणी हवामानाचा अंदाज घेऊन, पावसाच्या आगमना बद्दल आणि क्षमतेबद्दल शास्त्रशुद्ध माहीती मिळवून मगच लागवडीला सुरुवात करावी.
आज आपण पाहणार आहोत ह्याच हरभरा पिकाच्या लागवडी बद्दल संपूर्ण माहिती.
हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७oo ते १o00 मि.मी. पर्जन्यमान असणा-या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो.
हरभरा लागवडीचे दोन भाग पडतात. जिरायत आणि बागायत. आधी वर्णन केलेल्या जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पिक चांगले येते. जमीन उथळ आणि मध्यम असेल आणि तरीही त्यात तुम्हाला हरभरा घ्यायची असेल तर, काही हरकत नाही. अश्याही जमीनीत हरभरा चांगला येवू शकतो पण त्यासाठी पाण्याचे नियोजन व्यवस्थित असायला हवं. म्हणजेच सिंचन व्यवस्था उत्तम उभारावी लागते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते.
पिकाच्या वाढी दरम्यान ही हवामान कसे असावे हे ही महत्वाचे आहे. लागवडीनंतर पिक २० दिवसांचे झाले की किमान तापमान १० अंश ते १५ अंश आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सियस इतके असावे लागते. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणा-या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.
लागवडीच्या पध्दतीकडे जाण्याआधी जाणून घेऊया हरभरा पिकासाठी पुर्वमशागत कशी केली जाते.
हरभरा पिकाची मुळे जमिनीत खोल वर रुजत जात असतात. म्हणून अश्या पिकासाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. त्यामुळे खरीप पिक घेऊन झाल्यावर जमिनीची २५ सें. मी. खोल नांगरट करावी आणि मग कुळवणीच्या दोन पाळ्या घ्याव्यात. खरिपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.
हरभरा पिकासाठी पेरणीची वेळ ही फार महत्वाची असते. जिरायत हरभरा लागवडीसाठी जमीनीत ओलसरपणा असेल तेव्हा पेरणी केली तर जिरायती हरभरा पिक उत्तम येते. म्हणजेच ही पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहील्या पंधरवड्यात करावी लागते.
कारण हरभरा पेरणीनंतर सप्टेबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणा-या पावसाचा जिरायत हरभ-याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्र असेल तर हरभरा बियाणाची पेरणी जमीनीत १० सें. मी जाईल इतक्या खोलवर करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभ-याची पेरणी २० ऑक्टोबर ते १0 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. बागायत क्षेत्रातील हरभऱ्याची पेरणी जिरायती क्षेत्राचा निम्या खोलीवर म्हणजे ५ सें. मी. वर केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशिरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभ-याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३o सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १0 सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रतिहेक्टरी अपेक्षित रोपाची संख्या मिळते.
आता लागवडीसाठी जे बियाणे वापरले जाते त्याची किती मात्रा योग्य असते हे ही बघणं गरजेचं आहे. हरभन्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता ६५ ते ७0 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता १oo किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. ४ या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता १२५ ते १३० किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. ९0 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.

लागवडी दरम्यान आणि नंतरही पिकांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे खत आणि खतांची मात्रा. हरभऱ्याचे सुधारित वाण
खत आणि पाणी ह्यांना चांगला प्रतिसाद देतात. म्हणून खतांची मात्रा योग्य प्रकारे देणे गरजेचे आहे. शेवटच्या कुळवणीच्या वेळी प्रती हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरवावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा ५0 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पीक फुलो-यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
कोणत्याही पिकासाठी लागवडीनंतर आंतरमशागत करणं ही पिकांच्या निरोगी वाढीसाठी महत्वाची बाब आहे. त्यासाठी ३० ते ४५ दिवसात शेत तणविरहीत ठेवावे. त्याने उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन या तणनाशकाची २.५ ते ३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
हरभऱ्याच्या लागवडीसाठी काही वाण प्रचलित आहेत. जसे की विजय, विशाल, दिग्विज, विराट, कृपा, पिकेव्हिके -२, पिकेव्हिके – ४, बिडीएनजी -७९७, साकी-९५१६, जाकी -९२१८. हे सर्व वाण आता लागवडीखाली आहेत.
जिरायत हरभरा आणि बागायत हराभरा ह्यांच्यासाठी पाण्याचे नियोजन वेगवेगळे असते. जिरायत हरभरा पिकाला जमीनीत कमी ओलाव असेल, आणि पाणी देणे अश्यावेळी श्यक्य असेल तर पिकाला फुले येताच पाणी द्यायला सुरुवात करावी. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करतांना दोन सऱ्यांमधील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुधा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले,४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ से.मी पाणी लागते. श्यक्य असल्यास पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. कारण हरभरा पिक पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असते. तुषार सिंचनाने गरजे प्रमाणे पाणी दिल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थीतपणे करता येते आणि ह्यामुळे उत्पादनातही वाढ होते.
हुशार शेतकरी कधीही आपल्या शेतातील एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. एका दगडात दोन पक्षी मारणं हे कधीही चांगलं. म्हणून कुठल्याही मुख्य पिकासोबत आंतरपिक घेणं म्हणजे हुशारी.
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभ-याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे.
घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कोड आहे. घाटे अळी ही कोड ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १o ते १२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर १५ ते २० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/ हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १o लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९o लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (विषाणूग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढे दर्शविल्याप्रमाणे कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.